युवा उर्जेने पेटलेलं स्वप्न, समाजासाठी काहीतरी करण्याची द्द मनात,
असा एक तरुण — ऋतिक, ज्याने बदलाची वाट धरली निश्चयात.
रक्तदानातून दिलं ऋतिकने जीवनाचं दान,
प्रत्येक थेंब म्हणतो — “हीच मानवतेची शान!”
कोविडच्या काळात जेव्हा सारा जग थरथरलं,
ऋतिकच्या हातून मोफत जेवणाचं प्रेम पसरलं.
लसीकरण मोहिमेत दिला सुरक्षिततेचा संदेश,
“आरोग्य म्हणजे संपत्ती” – असा झाला विश्वासाचा देश.
वृक्षारोपणातून धरतीला हिरवाईचं वस्त्र चढवलं,
निसर्गाच्या कुशीत ऋतिकने नवजीवन रुजवलं.
वारकरी विद्यार्थ्यांना खाऊ वाटला आनंदानं,
त्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं आपुलकीनं.
विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देऊन उजळवलं ज्ञान, कारण शिक्षणातच दडलंय भविष्याचं स्वप्न महान.
जेव्हा अन्यायाविरुद्ध उठवायची वेळ आली,
ऋतिक पुढे उभा राहिला, जिद्दीने पेटली ज्योत पवित्र कळी.
ऋतिकसारखे हात जेव्हा समाजासाठी पुढे येतात,
तेव्हा बदल घडतो — हृदयात आशेचे दिवे पेटतात.

Post a Comment
0 Comments